कृषी खातं रिकामं शेतकरी संकटात!-Vacant Agri Posts Farmers in Trouble!

Vacant Agri Posts Farmers in Trouble!

संगमेश्वर तालुक्यातल्या कृषी विभागात बऱ्याच जागा मोकळ्याच पडल्यात. ह्यामुळे पावसाळ्याच्या ऐन उंबरठ्यावर शेतकऱ्यांना सरकारी योजनांचं काही खरं नाही. अधिकारीच नाहीत, तर योजना कुणी चालवायच्या? शेतकरी म्हणतोय, “हे सरकार फक्त कागदावरच योजना चालवतंय का काय?”

Vacant Agri Posts Farmers in Trouble!तालुका कृषी अधिकारी जागा गेले आठ महिने रिकामी आहे. त्याच्यासोबत सहाय्यक कृषी अधिकारी, दोन पर्यवेक्षक, तीन लिपिकांचंही काही ठिकाण नाही. ३७ कृषी सहाय्यकांपैकी तब्बल १६ जागा रिकाम्या. म्हणजे काम करणारे बोटावर मोजण्याइतके!

हे सगळं ओझं काही मोजक्याच माणसांवर पडलंय. एकाला दोन-तीन गावांचं काम दिलंय, त्यामुळे त्यांची धावपळ आणि शेतकऱ्यांचं नुकसान सुरू आहे. हेच पाहून शेतकरी म्हणतोय, “आम्ही रात्रंदिवस राबतोय, पण सरकार आमच्यासाठी पावलं टाकायला तयार नाही.”

लोकप्रतिनिधी म्हणतात, “शेतकऱ्यांसाठी झटतोय”, पण खरं सांगायचं तर या रिकाम्या जागांबाबत ते गप्पच बसलेत. कुणी आवाज उठवत नाही, आणि आम्ही शेतकरी मात्र हातात फडके घेऊन वाट बघतोय. गावोगावातून संताप व्यक्त होतोय, पण प्रशासन आणि राजकारणी सगळे बहिरे झाल्यासारखे वागतायत

Leave A Reply

Your email address will not be published.