महिलांसाठी आनंदवार्ता !! आता लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये नाहीतर २१०० रुपये मिळणार !

Update on 2100 in Ladki Bahin Yojana!

लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट आला आहे . आता महिलांना दर महिन्याला १५०० रुपये ऐवजी २१०० रुपये मिळणार आहे . ही महिलांसाठी आनंदवार्ता ठरेल. चला तर मग या योजनेबद्दल जाणून घ्या . लाडकी बहिण योजना ही २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे. त्यामुळे ६५ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभ थांबतो, आणि यामुळे लाभार्थ्यांची संख्या नियमितपणे बदलत राहते. सध्या जवळपास १.२० लाख महिलांनी वयोमर्यादा ओलांडली असून, त्या योजनेतून बाद झाल्या आहेत.

तसेच या संदर्भातील पुढील सर्व महत्वाचे अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल लगेच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा. 

Update on 2100 in Ladki Bahin Yojana!

महायुती सरकारची लोकप्रिय योजना
महाराष्ट्रातील महायुती सरकारची सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणजे लाडकी बहिण योजना. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली. या योजनेमुळे महायुतीला मोठे यश मिळाले आणि २३२ जागांवर विजय मिळवला, तर महाविकास आघाडीला ५० जागाही मिळाल्या नाहीत. निवडणूक जाहीरनाम्यात लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे बहिणी आता २१०० रुपये कधीपासून मिळणार याची वाट पाहत आहेत.

सभागृहातील महत्त्वाची माहिती
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहिण योजना संदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केले. आमदार अनिल परब यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी २१०० रुपयांबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. अर्थसंकल्पात यावर निर्णय होईल, मात्र सध्या कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे बहिणींना २१०० रुपये मिळण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी लागेल.

तथापि, महिला दिनापूर्वी फेब्रुवारी व मार्च महिन्याचे मिळून ३००० रुपये मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, २१०० रुपये देण्यासंबंधी अधिकृत निर्णय लवकरच घेतला जाईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

निकषात कोणताही बदल नाही
लाडकी बहिण योजनेच्या पहिल्या शासन निर्णयातील निकष तसेच कायम ठेवण्यात आले आहेत. कोणतेही नवीन बदल झालेले नाहीत. अर्जाची छाननी सतत सुरू असून, जे निकष पूर्ण करत नाहीत, त्यांना आर्थिक लाभ मिळणार नाही.

महत्त्वाचे निकष:

ही योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी लागू आहे.
६५ वर्षे पूर्ण झाल्यावर लाभ थांबतो.
इतर राज्यांत स्थायिक झालेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
सध्या २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केले असून, त्यापैकी २ कोटी ५२ लाख महिला पात्र ठरल्या आहेत.

निष्कर्ष:
२१०० रुपये मिळणार का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी होईल का, याकडे संपूर्ण राज्यातील महिलांचे लक्ष आहे.

1 Comment
  1. Ragini Gaikwad says

    ज्या लाडक्या बहिणींनी अजूनही फॉर्म भरला नाही त्यांना आता फॉर्म भरता येईल का?

Leave A Reply

Your email address will not be published.