सावधान! – लाडकी बहीणची फेरतपासणी होणार! दिलेली रक्कम सुद्धा..!!
ladki bahin fasavnuk Action
अपल्याला माहीतच असेल, निवडणूक प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजनेचा मासिक भत्ता ₹1500 वरून ₹2100 करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. आता या योजनेच्या लाभार्थींशी संबंधित मोठा निर्णय घेण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. सरकार या योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचतो आहे का, याची खात्री करण्यावर भर देणार आहे (ladki bahin fasavnuk Action ) . आता सरकार या योजने संदर्भातील निकष अधिक कठोर करणार असल्याचे संकेत आहे, याचा उद्देश योग्य लाभार्थांपर्यंत या योजनेचा लाभ मिळावा असा आहे. तसेच, प्राथमिक टप्यात अनेक अर्दारांना रक्कम प्राप्त झाली. त्यात जास्तकडक व्हेरिफिकेशन निकष नव्हते. त्या मुळे योजनेचे नियम डावलून अनेकांनी हि रक्कम आपल्या खात्यात वळती केली. परंतु आता हे चित्र बदलणार असून योग्य लाभार्थ्यांचा रक्कम मिळेल.
लाडकी बहीण योजनेत अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही, हे तपासण्यासाठी व्यापक पडताळणी प्रक्रिया राबवली जाणार आहे. या प्रक्रियेमुळे आर्थिक सहाय्य वितरणात अधिक पारदर्शकता येईल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे अपात्र अर्जदारांना वगळून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळेल, याची खात्री केली जाईल.
योजनेची अर्ज नोंदणी सुरू असली, तरी कागदपत्रांची सखोल तपासणी करून अर्ज मंजूर करण्यात यावेत असे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आला आहे. गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करून केला जाईल त्याचबरोबर मिळालेल्या लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे.
राज्यातील सुमारे 2 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहेत. मात्र, सरकारची योजना फक्त पात्र महिलांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे. यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर तपासणी प्रक्रिया सुरू करणार असून योजनेच्या लाभांची योग्यतेनुसार वाटप सुनिश्चित केले जाणार आहे. तसेच या योजनेच्या अंमलबजावणीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. बनावट कागदपत्रे सादर करून या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांची सरकार ओळख करून देत आहे. बनावट दस्तऐवज अर्ज करून कोणी लाभ घेतला असेल तर. त्यामुळे सरकार अशा लोकांकडून वसुलीही करू शकते आणि अशा लोकांना तुरुंगातही पाठवू शकते.
पैसे मिळाले नाही