नवीन अपडेट !! अकरावी प्रवेश अर्जाची शेवटची संधी!-FYJC Form Last Chance!
FYJC Form Last Chance!
महाराष्ट्रात 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी केंद्रीय ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रिया प्रचंड मोठ्या प्रमाणावर राबवली जात आहे. सुमारे १२ लाख ७१ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मात्र या प्रक्रियेत एक मोठी तांत्रिक समस्या उद्भवली आहे – म्हणजेच अनेक विद्यार्थी अर्जाचा भाग-२ (कॉलेज पसंतीक्रम) भरायला विसरले आहेत.
आता बघ, तब्बल १ लाख ४१ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी ही चूक केली. कारण काय, तर तांत्रिक बिघाड, नेटवर्कची अडचण वगैरे.
सरकारनं याला गांभीर्यानं घेतलं आणि शिक्षण विभागानं ठरवलं – चुका झाल्यात तर सुधारायची संधी मिळालीच पाहिजे!
त्यामुळं आता ज्यांनी अर्जाचा भाग-१ भरलाय, पण भाग-२ भरला नाय – त्यांना आज ७ जून दुपारी १२.३० वाजेपर्यंत अर्ज पूर्ण करता येणार हाय.
फक्त एक अट – नोंदणी शुल्क भरलेलं असायलाच पाहिजे.
जर तू हे केलं नाय, तर तुझा अर्ज मेरिट लिस्टमधे धरला जाणार नाही आणि प्रवेशाच्या पहिल्या फेरीत तुझं नावच येणार नाय