जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ७०८ शिक्षकांची पदं रिकामी -Where Are the Teachers Gone?

Where Are the Teachers Gone?

यवतमाळ जिल्ह्यात सध्या शिक्षणाचा खराखुरा पेच निर्माण झालाय. जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल ७०८ शिक्षकांची पदं रिकामी आहेत. मुलं रोज शाळेत जातायत, पण वर्गात शिकवायला कोणीच नाही. इतकंच काय, पोरं घरी येऊन विचारतायत – “आई, आपले गुरुजी कुठं असतात?”

Where Are the Teachers Gone?जिल्ह्याला एकूण ४८७९ शिक्षक पदं मंजूर असली, तरी केवळ ४१७१ पदांवरच कर्मचारी कार्यरत आहेत. सहायक शिक्षकांची रिक्तता सर्वाधिक असून – बापरे! ७०८ जागा अजूनही भरायच्या आहेत.

मागच्या वर्षी पवित्र पोर्टलद्वारे काही जागा भरल्या खऱ्या, पण अजूनही शिक्षक अपुरेच. काही पेसा क्षेत्रांमध्ये तात्पुरत्या करारावर १९५ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती, आणि यंदाही तसंच करण्याची योजना आहे.

आणि गंमत म्हणजे, १७० केंद्रप्रमुखांची पदंही रिकामी आहेत. त्यामुळेच शिक्षकांनाच दुहेरी जबाबदारी दिली जातेय – एकाच वेळी वर्गशिक्षक आणि केंद्रप्रमुख! आता यात शिक्षणाचं नुकसान होणार नाही तर काय?

शासन आदेशाची वाट बघितली जातेय, पण तोवर मुलांचं शिक्षण मात्र अर्धवटच राहतंय. प्रश्न एवढाच – जबाबदारी कोण घेणार?

Leave A Reply

Your email address will not be published.