शेतकऱ्यांसाठी दिलासादायक भरपाई ! – Farmer Relief Govt Sanctions Compensation!
Farmer Relief Govt Sanctions Compensation!
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात, नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत स्पष्ट केले की, ३१ मार्चपर्यंत नुकसान भरपाई वितरित केली जाईल.
परभणी जिल्ह्यात खरीप २०२४ मध्ये ४२६.५५ कोटी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून, ४.१० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ४७३.४४ कोटी निधी मंजूर झाला असून, त्यातील ४१७.१२ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी १७३४.२६ कोटी पीक विमा मंजूर करण्यात आला असून, ३३.९७ लाख हेक्टर क्षेत्र बाधित आहे. त्यासाठी ३०६७.५२ कोटी निधी मंजूर, तर २४५८.६२ कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.
राज्यात एकूण २१९७.१५ कोटी नुकसान भरपाई मंजूर असून, विमा कंपन्यांना राज्य हिस्सा हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार सज्ज आहे!