नवीन बातमी !! वसई तहसील कार्यालयात ७५ पदे रिक्त ; कर्मचारीच नाही !-75 Posts Vacant in Vasai Tehsil Office!

75 Posts Vacant in Vasai Tehsil Office!

वसई तहसील कार्यालयात कर्मचारीच नाहीत म्हणा ना! एकूण १४४ पदं मंजूर असताना फक्त ६९ कर्मचारी कामावर आहेत, म्हणजे ७५ जागा रिकाम्याच. आता एवढं मनुष्यबळ कमी असलं की, लोकांची सरकारी कामं वेळेत पूर्ण होणं कठीणच.

75 Posts Vacant in Vasai Tehsil Office!

याचाच गैरफायदा घेऊन मध्यस्थ म्हणजे दलाल लोक खेळ करतायत. लोक दाखल्यांसाठी, तक्रारींसाठी वारंवार फेऱ्या मारतात, पण निकाल काही लागत नाही.

तहसीलदारांनी ही रिक्त पदं भरावीत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, पण काही हालचाल नाही. वरतून आज या ऑफिसात जवळपास ६०-७० खाजगी लोकच काम सांभाळतायत – आणि त्यांना पगार कोण देतो? हे तर स्वतंत्र संशोधनाचं काम!

तलाठी, कोतवाल, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, ड्रायव्हर – अशी अनेक पदं वर्षानुवर्षं रिकामी आहेत. त्यामुळे कामाचा ताण उरलेल्या कर्मचाऱ्यांवर जबरदस्त आहे.

कामं वेळेत होत नाहीत, कागदपत्रं हरवतात, पोस्ट टाकून ठेवली जाते, सुनावण्या लांबतात – नागरिक त्रासून गेलेत. अधिकारी म्हणतात, “दोन माणसं असली तरी सेवा देतो,” पण दर्जा कुठे राहतोय? वेळेवर कामं पूर्ण होतात का? हे प्रश्न अजूनही उभेच आहेत.

आता तरी सरकारने जागं व्हावं, रिक्त जागा भरून सामान्यांना दिलासा द्यावा!

Leave A Reply

Your email address will not be published.