राज्यात ४७२ शिक्षक पदासाठी जागा रिक्तच!-472 Teaching Posts Vacant!

472 Teaching Posts Vacant!

राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सध्या सुरु असून, तब्बल १५८६ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, पवित्र पोर्टलवरून केवळ १११४ उमेदवारांचीच शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे उर्वरित ४७२ जागा अजूनही रिक्त राहणार आहेत, कारण त्या जागांसाठी पात्र उमेदवारच उपलब्ध नाहीत.

472 Teaching Posts Vacant!

२०२३ मध्ये दोन लाखांहून अधिक डीएड, बीएड धारकांनी ‘टेट’ परीक्षा दिली होती. त्यातून पहिल्या टप्प्यात भरती पूर्ण झाली होती. आता दुसऱ्या टप्प्यात देखील काही अडचणी येत आहेत. २७ मेपासून तिसऱ्या टप्प्यातील ‘टेट’ परीक्षा घेण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, काही जिल्हा परिषद व नगरपरिषदांनी रोस्टर अद्ययावत न केल्यामुळे त्यांच्या जागा भरती प्रक्रियेतून वगळल्या गेल्या आहेत. त्यामुळे या टप्प्यात फक्त १८ जिल्ह्यांनीच ४६८ पदांची जाहिरात दिली आहे. यामध्ये १३ महापालिका – ३६२ जागा, ५७ नगरपरिषद – २२१ जागा आणि खासगी संस्था – ५३७ जागा अशा प्रकारे पदे रिक्त दाखविण्यात आली.

यवतमाळ जिल्ह्याला मात्र या टप्प्यातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे. पवित्र पोर्टलवर उमेदवार नसल्याने त्यांना संधीच मिळालेली नाही. आता पुढील भरतीसाठी नवे ‘टेट’ परीक्षा पात्र उमेदवार तयार करणे हाच एकमेव उपाय असल्याचे स्पष्ट होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.