महत्वाचे, त्वरित असे कराआधार लिंक, नाहीतर योजनांचा लाभ होईल प्रभावित!
10 Lakh Beneficiaries Lose Aid Due to Lack of Aadhaar Link
राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना यांमधील तब्बल १० लाख लाभार्थी आधार लिंक नसल्याने वंचित राहिले आहेत. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून आर्थिक मदत थांबली असून, लाभ मिळत नसल्याने लाभार्थी बँकांच्या फेऱ्या मारत आहेत. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंगही घडत आहेत.
या योजनेंतर्गत निराधार, अंध, विकलांग, घटस्फोटीत स्त्रिया आणि अनाथ मुलांना दरमहा १,५०० रुपये मिळतात. यापूर्वी बँकांना लाभार्थ्यांच्या याद्या दिल्या जात, मात्र आता रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०२४ पासून हा नियम लागू झाला.
बँक आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना लाभार्थींची बँक खाती आधारशी जोडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, प्रशासनाला सर्व खाती लिंक करण्यात अपयश आले. त्यामुळे १० लाख लाभार्थींची मदत रोखण्यात आली.
सामाजिक न्याय विभागाकडे ४३ लाख लाभार्थ्यांची नोंद आहे, त्यातील १९.७४ लाख लाभार्थींची खाती आधारशी जोडलेली आहेत, तर १० लाख खाती अजूनही लिंक नाहीत. ही यादी तपासली जात असून, काही लाभार्थी अपात्र ठरू शकतात. वेळीच तोडगा निघाला नाही, तर मोठा उद्रेक होण्याची शक्यता आहे.